किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची: ३०३८ मीटर
डोंगररांग: लोणावळा
श्रेणी: मध्यम
जिल्हा: पुणे
मुंबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की, लोहगड-विसापूर ही किल्ल्यांची जोडगोळी
गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेते. मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो
लोहगड, मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर
किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवनामावळात मोडणारा हा विसापूर किल्ला, लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण
करण्यासाठी बांधण्यात आला होता.
इतिहास :
विसापूर किल्ल्याबाबत एतिहासिक कागदपत्रांमध्ये
पुढिल माहिती मिळते,
मराठे १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात
पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात
शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे
पोहोचला. तेथे झालेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर
किल्ल्यावर गेल्याचे समजले , तो
पाठलाग करत तेथे पोहोचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहोचले. १६८२ मध्ये
मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता.
४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड
जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर
इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
पहाण्याची ठिकाणे :
पायर्यांच्या सहाय्याने किल्ल्यावर जाताना एक
मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची रहाण्याची सोय
होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावरील
पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी आपले लक्ष्य वेधून घेते. गडावर एक मोठे जातंही आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई - पुणे लोहमार्गावर मळवली या रेल्वे
स्थानकावर उतरावे. येथून भाजे गावात यावे. भाजे गावातून विसापूर किल्ल्यावर
जाण्यास दोन वाटा आहेत.
१) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास
वाटाड्या घेणे आवश्यक ठरते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पायर्या आहेत. या पायर्या
सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून
गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण मोडकळीस आलेल्या पायर्यांपाशी पोहोचतो
येथे बाजूलाच एक मंदिर आहे.
२) दुसर्या वाटेने भाजे गावातून गायमुख
खिंडीपर्यंत यावे. गायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर
किल्ल्यावर घेऊन जाते.
३)मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्स्प्रेस
हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा
जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे.
राहाण्याची सोय:
गडावर रहाण्यासाठी दोन गुहा आहेत.
जेवणाची सोय:
जेवणाची सोय आपण स्वत…च करावी.
पाण्याची सोय:
गडावर पिण्याच्या पाण्यासाठी तळी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ:
भाजे गावातून अडीच तास लागतो.
सूचना:
विसापूर व भाजे लेणी एका दिवसात व्यवस्थित
पाहून होतात.
No comments:
Post a Comment